file photo 
छत्रपती संभाजीनगर

या आवडत्या पक्षापासून माणसांना भिती ॲलर्जी, दम्याची : वाचा 

मधुकर कांबळे

औरंगाबाद : अनेक वर्षांपूर्वी संदेश घेऊन पोष्टमनची भूमिका बजावणाऱ्या कबुतरांची शहरातील वाढती संख्या माणसांसाठी धोकादायक ठरत आहे. माणसांनीच त्याचे लाड केल्याने व शिकारी पक्षांची संख्या कमी झाल्याने कबुतरांची संख्या वाढली आहे. आधीच करोनाबाधिताना श्‍वसनाला त्रास होतो , त्यात कबुतरामुळे फुफ्फुसाशी संबंधित आजार होऊ शकतात. त्यामुळे शहरात कबुतरांची संख्या वाढल्याने कोरोनाचा संसर्ग वाढवण्यास कबुतरे अप्रत्यक्षपणे मदत करत आहेत. 

इतिहासकाळात कबुतरांमार्फत संदेश पाठवला जायचा. बारीक नळीमध्ये पत्र किंवा संदेशाचा कागद घालून तो कबुतरांच्या पायाला किंवा पाठीवर बांधून ते कबुतर इच्छित स्थळी पाठवितात. या कामाकरिता शिकवून तयार केलेल्या कबुतरांना ‘संदेशवाहक कबुतरे म्हणतात. मोगल बादशहा सम्राट अकबराकडे असे संदेशवाहक कबुतरे फार मोठ्या प्रमाणात होते असे इतिहासात संदर्भ मिळतात. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

काही वर्षांपूर्वी तरुणाईमध्ये ‘ कबुतर जा जाऽ जाऽऽ " हे गाणं लोकप्रिय झाले होते. मात्र त्या गाण्याचे संदर्भ बदलले असून आता कबुतरांना इथून निघून जा असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

कबुतर शांततेचे प्रतीक ? 

हजारो पक्षांवर उपचार करून त्यांना पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे गेल्या अनेक वर्षांपासून काम करणारे पक्षीप्रेमी डॉ. किशोर पाठक म्हणाले, कबुतर हे शांततेचे प्रतीक आहे ही पश्‍चिमी देशांची कल्पना आहे. पाश्चिमात्य तसे मानतात म्हणून आपणही त्यांचेच अनुकरण करतो. कोणेतेही पक्षी एका मर्यादेपर्यंत हवेहवेसे वाटतात. मात्र त्यांची भरमसाठ संख्या झाली तर ते त्रासदायक ठरतात. असाच प्रकार सध्या कबुतरांच्या बाबतीत झाला आहे.

कबुतराचे माणसांनी खूप लाड केले आहेत. जे त्यांचे असलेले आणि नसलेलेही खाद्य त्यांना खायला देत असल्याने त्यांनी मानवी वस्त्यांमध्ये ठाण मांडले आहे. तसेच शिक्रा, चिमणी ससाणा हे शिकारी पक्षी कमी होणे हेही कबुतरांची संख्या वाढण्याला कारणीभूत आहेत. औरंगाबाद शहरात किमान १० हजार कबुतरे आहेत. ही धीट झालेली कबुतरे आता चक्क घरांच्या जाळ्या, दुकानांच्या शटरवर, घराच्या परिसरातील कुंड्यामध्ये घरटी तयार करून अंडी घालत आहेत. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कबुतरापासून होतात ॲलर्जी, फुफ्फुसाशी संबंधित आजार 

कबुतर जरी अनेकांना आवडत असले तरी त्याच्यापासून माणसांना अनेक आजार होऊ शकतात. डॉ. पाठक म्हणाले, कबुतरांमुळे दमा, अॅलर्जी, फुफ्फुस आणि श्वासाशी संबंधित आजार होतात. त्यांच्या खाली पडणाऱ्या बारीक पिसांमुळे व त्यांच्या विष्ठेद्वारे माणसांना या आजारांची लागण होऊ शकते.

यासाठी याबाबत काळजी घेतली नाही, तर कबुतरांची विष्ठेतुन बुरशीजन्य कवकामुळे दमा, सर्दी सारखे आजार गंभीर होऊ शकतात. कबुतरांना असो की अन्य कोणत्याही पक्षांना पाणी जरूर द्या मात्र त्यांना काहीही खायला देऊन आळशी बनवू नका. दुष्काळी परिस्थितीत किंवा उन्हाळ्यात पक्षांच्या दाना पाण्याची व्यवस्था करा मात्र एरवी त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे खाऊ द्यावे असे मत डॉ. पाठक यांनी व्यक्त केले. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT